पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

करूया ताणाचा सामना

इमेज
एका ऑफिसमध्ये एक प्रचंड शिस्तीचे साहेब होते. जरा सुद्धा कामात चूक झाली तर साहेबांसमोर धडगत नसायची. ऑफिसमधले सगळे साहेबांना प्रचंड घाबरायचे. एक दिवस ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शुभमला साहेबांनी एक महत्वाचं पत्र लिहायला सांगितलं. शुभमनं डोळ्यात तेल घालून अत्यंत वळणदार अक्षरात ते पत्र लिहिलं. दोन-दोन वेळा तपासून त्यानं ते पत्र साहेबांकडं पाठवलं. दहा मिनिटात साहेबांचा शिपाई शुभमकडे आला आणि म्हणाला कि तुम्हाला साहेबांनी ताबडतोब बोलवलं आहे. हे ऐकून शुभमला खूपच चिंता वाटायला लागली. शुभमला टेंशन आलं. आणि त्यानंतर शुभम साहेबांना न भेटता अर्धी रजा टाकून तो घरी निघून गेला. टेंशन आल्यावर शुभम असा का वागला? या परिस्थिती पासून पळ काढल्याचा त्याला फायदा होईल कि त्यानं अजून काही करायला हवं होतं?   हे शोधायला आपण थोडं इतिहासात जाऊयात. उत्क्रांतीच्या काळात सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांना, ताणाला, टेंशनला आदिमानव कसा सामोरं जात असेल? समजा त्याचा सामना एका वाघाशीच झाला. तर तो या वाघाला कसा सामोरं जात असेल? या किंवा अशा ताणाच्या प्रसंगात आदिमानव पहिल्यांदा घाबरायचा. त्यानंतर त्याच्यासमोर २ पर्याय असायचे एकतर...