पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संवाद कौशल्य

इमेज
शिवाजी महाराजांनी जावळीच्या घनदाट खोऱ्यातील चंद्रराव मोरेची जहागीरी नेस्तनाबूत केली. त्यावेळी मोरेचा एक मावळा दोन्ही हाती दांडपट्टा घेऊन झुंझत होता. त्याच्या या आघातांमुळे महाराजांचा कोणताही सैनिक पुढे सरकू शकत नव्हता. अगदीच वेळ आली असती तर धनुष्यबाण चालवणाऱ्या सैनिकाला बोलावून त्या मावळ्याला हटवता आलं असतं. परंतु, महाराजांनी त्या वीर मावळ्याशी संवाद साधून आपलं, ‘श्रींचं’ स्वराज्य स्थापनेचं आपलं ध्येय त्याला इतक्या कुशलतेनं पटवून दिलं कि तो त्यानंतर स्वराज्याचा एकनिष्ठ पाईक बनला. पुढे तो मावळा किल्लेदार झाला. पुरंदरावर घडलेल्या त्याच्या स्वामीनिष्ठेच्या प्रसंगाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. त्या किल्लेदाराचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे. शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर ते मुरारबाजीला धारातीर्थी पाडू शकले असते. पण त्यांनी वेगळा विचार केला. असा मोहरा मारण्यापेक्षा स्वराज्याच्या कामी आला पाहिजे हा विचार. हा वेगळा दृष्टीकोन. शिवचरित्रात असे योग्य दृष्टीकोन असणारे प्रसंग आपल्याला विपुल प्रमाणात दिसतात. या उदाहरणावरून वरून लक्षात येतं कि घडणाऱ्या किंवा घडलेल्या घटनेपेक्षा आपला त्या घटनेक...