पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आनंदाचं सेलिब्रेशन

इमेज
T-२० विश्वचषक २०१६. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना. बांगलादेशला भारताच्या विरुद्ध T-२० सामन्याच्या पहिल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ३ बॉलमध्ये केवळ २ धावांची गरज होती. भारताने केलेल्या १४७ धावांच्या आव्हानातील १४५ धावा बांगलादेशने सहजपणे पूर्ण केल्या होत्या. बांगलादेशचा फलंदाज सामना पूर्ण झाल्याच्या अविर्भावात खेळत होता. तो खूप उत्साहित झाला होता. षटकार मारून आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी त्याने जोरात बॉल फटकावला. अति उत्साहामुळे बॉल त्याला नीट मारता आला नाही आणि षटकाराऐवजी भारताच्या खेळाडूच्या हातात सोपा झेल गेला. पुढे आलेला फलंदाज यातून काही धडा घेऊ शकला नाही. तो सुद्धा अशाप्रकारे बाद झाला. शेवटच्या बॉलवर आणखी एक फलंदाज रनआउट करून भारताने हा सामना २ धावांनी जिंकला. भारत हा सामना जिंकला असं म्हणण्यापेक्षा बांगलादेश हा सामना हरला असंच म्हणावं लागेल. कारण जरी भारतीय कर्णधाराने ताणाचे समायोजन योग्य प्रकारे केले तरी हातात आलेली मॅच घालवण्यासाठी बांगलादेशी फलंदाजांनी लवकर सुरु केलेल्या मॅच जिंकण्याच्या आनंदाच्या सेलिब्रेशनमुळे त्यांचे उरलेल्या धावा काढण्यामागचे लक्ष उडाले ...

सामाजिक चिंता

इमेज
‘गेली 15 वर्ष मी ज्या ठिकाणी काम करतो ते माझं ऑफिस सोडायचा मी विचार करतोय. कारण, माझ्या मागून आलेली मुलं छान पद्धतीने लोकांना काम सांगतात, कामगारांकडून काम करवून घेतात आणि मला हे अजिबात जमत नाही. लोकांसमोर उभं राहून बोलायची मला प्रचंड भीती वाटते. ते काय म्हणतील? माझ्याबद्दल चुकीचं मत तरी ते करून घेणार नाहीत ना? ते मला चुकीचे ठरवणार नाहीत ना? असे असंख्य प्रश्न लोकांसमोर मी बोलायला उभा राहिलो, लोकांशी मी बोलायला लागलो की माझ्या मनात येतात. यामुळे मी माझ्या बॉसना पण नीट उत्तर देऊ शकत नाही आणि याचा परिणाम माझं प्रमोशन पण होत नाही.’ माझ्या क्लिनिकमध्ये बंडोपंत मला त्यांच्या ऑफिसमधल्या वर्तनाबद्दल सांगत होते. ‘ऑफिसच काय घेऊन बसलात माझ्या मित्रांसमोर सुद्धा अनेकदा माझं असं होतं. बँकेत सगळ्यांसमोर चेकवरची सही सुद्धा माझी बर्‍याचदा चुकली आहे. लोक समोर आले की माझी भीतीने गाळण उडते.’ बंडोपंतांना होणाऱ्या या त्रासाला मानसोपचार शास्त्रात सामाजिक चिंतेची समस्या म्हणजेच सोशल एन्झायटी डिसऑर्डर असं म्हणतात. आपल्याला काही सामाजिक प्रसंगात भीती वाटते, आपण खरंच अस्वस्थ होतो, आपल्या पोटात गोळा येतो. उदा....